Pages

Sunday, December 14, 2025

'वृक्ष वाचवा'चा संदेश देणारे 'द अदर वर्ल्ड'

सकाळ ( १४ डिसेंबर २०२५ )

 'वृक्ष वाचवा'चा संदेश देणारे 'द अदर वर्ल्ड'

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्यसिद्धांतची प्रस्तुती; नाटकाद्वारे पर्यावरणाबाबत जनजागृती



नाशिक, ता. १३ : पंचतत्त्वांच्या उत्पत्तीपासून सजीवसृष्टी आणि मानवनिर्मितीचा चाललेला अखंड प्रवास... हिमयुग-अश्मयुग ओलांडत मानवाने शेती आणि पशुपालनाच्या दिशेने केलेली वाटचाल... प्रवासात त्याने लावलेला अग्नीचा शोध... साधनांची निर्मिती, पाण्याचे नियोजन, बीज साठवण, निवाऱ्याची उभारणी आणि सहजीवनाची संगती, अशी आत्मसात केलेली अनेक मूलभूत कौशल्ये आणि हे सर्व निसर्गाशी सुसंगत करणे याचे प्रतिबिंब म्हणजे 'द अदर वर्ल्ड' नाटक.

थिएटर ऑफ रेलेवन्स 

नाट्यसिद्धांत प्रस्तुत 'द अदर वर्ल्ड' हे । नाटक शुक्रवारी (ता. १२) महाकवी कालिदास कलामंदिर येथे सादर करण्यात आले. पृथ्वी, पर्यावरण आणि मानवतेचे रक्षण, संवर्धन करण्याचा वसा घेतलेल्यांच्या जाणिवा मांडणारे हे नाटक होते. औद्योगिक क्रांतीने मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला वेग दिला आणि त्यातून भांडवलशाही, साम्यवाद अशा व्यवस्थांचा उदय झाला. तथाकथित 'विकासा'च्या या वाटा पर्यावरण, पर्यावरणशास्त्र (इकॉलॉजी) आणि हवामानाच्या संतुलनाला बाधा पोहोचवू लागल्या. त्यामुळे आज मनुष्य मानवी नाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे, हे नाटकातून मांडण्यात आले. पात्रांच्या माध्यमातून उभी करण्यात आलेली झाडे, वन्यपशू, झाडांखाली वावरण्याचा अभिनय, प्राण्यांचा हिंस्त्रपणा हे सारे वाखाणण्याजोगे होते.

नाटकात अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, तनिष्का लोंढे, नृपाली जोशी, प्रांजल गायकवाड आणि आरोही बाविस्कर यांनी भूमिका केल्या. लेखन व दिग्दर्शन मंजूल भारद्वाज यांचे होते. हे नाटक कोणतेही अनुदान, देणगी किंवा स्पॉन्सरशिप न घेता, निर्मात्याशिवाय केवळ प्रेक्षकांच्या सहभागाने नाटक प्रस्तुत करण्यात आले, हे विशेष!

Saturday, November 15, 2025

विनाशरूपी विकासाचे सत्य 'द... अदर वर्ल्ड' मध्ये उलगडणार

लोकमत,  शनिवार, दि. १५ नोव्हेंबर २०२५ 

 विनाशरूपी विकासाचे सत्य 'द... अदर वर्ल्ड' मध्ये उलगडणार 

औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिरात कार्यक्रम

पुणे : पुण्यातील औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिरात शनिवारी (दि. १५) सायंकाळी साडेपाचला विनाशरूपी विकासाचे सत्य उलगडणारे 'द... अदर वर्ल्ड' हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे, विनाशरूपी विकासाचे सत्य त्यातून उलगडले जाणार आहे.



माणूस विसरून गेला आहे की, तोही निसर्गाचा एकात्म भाग आहे. आज जेव्हा एखादी मोठी नैसर्गिक आपत्तीसमोर येते, तेव्हा राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे सगळे मुद्दे क्षणात बाजूला सरकतात. कारण निसर्ग जेव्हा आपले रौद्र रूप धारण करतो, तेव्हा आपण किती खुजे आहोत हे जाणवते. केदारनाथच्या

पुरापासून ते वायनाडमधील दुर्घटनेपर्यंत ते आता मराठवाड्यातील पुराची स्थिती अशा प्रत्येक संकटामागे मानवी हस्तक्षेप, निसर्गाची अयोग्य छेडछाड हीच मुख्य कारणे आहेत. 'वसुधैव कुटुंबकम्' हे आपण म्हणतो; पण प्रत्यक्षात आपल्या मातीशीच बेईमानी करतो. जमिनी, नद्या, जंगलं या साऱ्या नैसर्गिक संपत्तींचा अतिरेकी वापर आणि विनाश सुरू आहे. 'झाडे लावा, झाडे जगवा' हे केवळ

माणसाच्या मनाशी संवाद

रंगभूमीच्या चार प्रमुख प्रवाहांपैकी 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' हा सशक्त, मानवकेंद्री आणि परिवर्तनवादी नाट्य सिद्धांत आहे. सत्ता-पोषित रंगभूमी जिथे केवळ नाच-गाणी आणि बाह्यरंजन करते, तिथे 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' माणसाच्या मनाशी संवाद साधते, विवेकाला जागवते.

प्रपोगंडा थिएटर जिथे एका विचारधारेचा प्रचार करतं, तिथे हे समग्र भूमिकेचा पुरस्कार करतं आणि प्रत्येक सत्तेला आरसा दाखवते. बुद्धिजीवी रंगभूमी जिथे केवळ प्रयोग आणि तात्त्विक चर्चा करतात, तिथे 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' सामान्य माणसाच्या संघर्षांचे आवाज बनत माणसाला उन्मुक्त करण्याचे मानवी दर्शन आहे.

घोषवाक्य उरले आहे. निसर्गाविषयीची ही जागृती प्रत्येक स्तरावर आवश्यक आहे. जर्मनीसारख्या युरोपीय देशात गाजलेले 'द... अदर वर्ल्ड' हे नाटक आता भारतातही सादर होत आहे.

'द... अदर वर्ल्ड' हे नाटक आपल्याला हेच आठवण करून देते, की निसर्ग हाच आपला खरा मार्ग आहे. नैसर्गिक होऊन निसर्गाला जपण्याची आशा जागवते आणि बाहेरील प्रकृतीसोबत आपल्या आतील प्रकृतीला वाचवण्याची दृष्टी मांडते. या नाटकात पंचतत्वांच्या उत्पत्तीपासून सजीवसृष्टी आणि मानवनिर्मितीचा अखंड प्रवास उलगडतो. हिमयुग-अश्मयुगांमधून पुढे येताना मानवाने शेती आणि पशुपालनाची दिशा पकडली. या प्रवासात त्याने घेतलेले मूलभूत शोध अग्नीचा उपयोग, साधनांची निर्मिती, पाण्याचे नियोजन, बीजसाठवण, निवाऱ्याच्या उभारणीपासून ते सहजीवनाच्या व्यवस्थांची निर्मिती हे सर्व निसर्गाला पूरक असेच होते.

 मानवाचा विकास पृथ्वीच्या चक्राशी जोडलेला, सजीवसृष्टीच्या गरजांना ओळखणारा असा होता. पण कालांतराने संपत्ती आणि मालकीच्या संकल्पनांतून समाजव्यवस्थेचा विस्तार झाला आणि मानव दास्यत्व, गुलामगिरी व सरंजामशाहीच्या अंधारात गुरफटला. औद्योगिक क्रांतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला वेग दिला, ज्यातून भांडवलशाही आणि साम्यवाद यांसारख्या व्यवस्थांचा उदय झाला. तथाकथित 'विकासाचे' मार्ग पर्यावरण, इकॉलॉजी आणि हवामानाला बाधक ठरत आहेत. आपण विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहोत. पृथ्वी, पर्यावरण, इकॉलॉजी, हवामान आणि मानवता यांचे संरक्षण, जतन व संवर्धन करण्याचा संदेश हे नाटक कलात्मकतेने संवेदनशील भूमिका मांडते

Monday, October 6, 2025

'द अदर वर्ल्ड' नाटकाचा रविवारी जळगावात प्रयोग

'द अदर वर्ल्ड' नाटकाचा रविवारी जळगावात प्रयोग

पर्यावरण संवर्धन संकल्पनेवर आधारित


'द अदर वर्ल्ड' नाटकाचा रविवारी जळगावात प्रयोग  पर्यावरण संवर्धन संकल्पनेवर आधारित  निसर्ग असा तांडव का करत आहे? काही सेकंदात गावेच्या गावे का गिळंकृत होत आहेत ? राज्येच्या राज्ये का बुडत आहेत ? दुष्काळ, पूर, आग, अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत ! महानगरे त्रस्त आहेत! जनतेला  जळगाव, ता. ६ : पर्यावरण संवर्धनासह जैवविविधतेचे रक्षण करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.. पण, हे कर्तव्यच आपण विसरुन गेल्याने सर्वत्र पर्यावरणीय समस्या उद्भवत आहेत. त्यासंबंधी जनजागृतीचा संदेश देणारे मंजुल भारद्वाज लिखित 'द.. अदर वर्ल्ड' हे नाटक रविवारी १२ ऑक्टोबरला जळगावात सादर होणार आहे. ही आपत्ती माहीत आहे, पण ती दोन दिवसांत विसरून जाते. विकासाने मनुष्याची दृष्टी इतकी भ्रष्ट केली आहे की तो आपल्याच पंचतत्त्वांशी युद्ध करीत आहे. कला जीवन वाचवते. कला मानवी चेतना जागृत करते. कला माणसाला माणूस बनवते. त्यातूनच 'थिएटर ऑफ रेलेवंस' जीवन वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. पर्यावरण आणि इकोलॉजीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकजागृती करणे अनिवार्य आहे.. त्याचाच भाग म्हणून 'थिएटर ऑफ रेलेवंस' प्रस्तुत "द... अदर वर्ल्ड" या नाटकाचा प्रयोग १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५:३० वाजता ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात सादर होणार आहे. #पर्यावरण #मराठी #दअदरवर्ल्ड #जलगांव #ecology


निसर्ग असा तांडव का करत आहे? काही सेकंदात गावेच्या गावे का गिळंकृत होत आहेत ? राज्येच्या राज्ये का बुडत आहेत ? दुष्काळ, पूर, आग, अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत ! महानगरे त्रस्त आहेत! जनतेला

जळगाव, ता. ६ : पर्यावरण संवर्धनासह जैवविविधतेचे रक्षण करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.. पण, हे कर्तव्यच आपण विसरुन गेल्याने सर्वत्र पर्यावरणीय समस्या उद्भवत आहेत. त्यासंबंधी जनजागृतीचा संदेश देणारे मंजुल भारद्वाज लिखित 'द.. अदर वर्ल्ड' हे नाटक रविवारी १२ ऑक्टोबरला जळगावात सादर होणार आहे. ही आपत्ती माहीत आहे, पण ती दोन दिवसांत विसरून जाते. विकासाने मनुष्याची दृष्टी इतकी भ्रष्ट केली आहे की तो आपल्याच पंचतत्त्वांशी युद्ध करीत आहे. कला जीवन वाचवते. कला मानवी चेतना जागृत करते. कला माणसाला माणूस बनवते. त्यातूनच 'थिएटर ऑफ रेलेवंस' जीवन वाचवण्यासाठी कटिबद्ध आहे. पर्यावरण आणि इकोलॉजीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकजागृती करणे अनिवार्य आहे.. 

त्याचाच भाग म्हणून 'थिएटर ऑफ रेलेवंस' प्रस्तुत "द... अदर वर्ल्ड" या नाटकाचा प्रयोग १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५:३० वाजता ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात सादर होणार आहे. #पर्यावरण #मराठी #दअदरवर्ल्ड #जलगांव #ecology

Friday, August 22, 2025

थिएटर ऑफ रेलेवन्स - सत्यपथावरील 33 वर्षाचा उत्सव आणि वैचारिक मंथन

 बहुजन सौरभ

शनिवार २३ ऑगस्ट २०२५

थिएटर ऑफ रेलेवन्स - सत्यपथावरील 33 वर्षाचा उत्सव आणि वैचारिक मंथन

पुणे : आज सायंकाळी 6 वाजता, पुण्यातील गांधी भवन, कोथरूड येथे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि थिएटर ऑफ रेलेवन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कला सत्वाचा सत्यपथावरील 33 वर्षाचा प्रवास' या चर्चासत्राने रंगकर्म आणि सत्य यांचा अनोखा संगम अनुभवला. हा कार्यक्रम थिएटर ऑफ रेलेवन्सच्या 33 वर्षांच्या सृजनशील प्रवासाचा उत्सव ठरला, ज्याने कला ही केवळ करमणूक नसून सत्याचा शोध आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले. गांधी भवनात आयोजित या चर्चासत्राला रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि सामान्य प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाची सुरुवात मंजुल भारद्वाज, थिएटर ऑफ रेलेवन्सचे संस्थापक, यांच्या प्रेरक उद्बोधनाने झाली. त्यांनी TOR च्या 33 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना सांगितले की, 'कला ही सत्याशी संनाद करणारी प्रक्रिया आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सने सत्याग्रह आणि प्रतिरोधाच्या भावनेतून समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि लाखो लोकांना स्वतःच्या अस्तित्वाचा बोध घडवला.' हे सांगताना त्यांनी त्यांच्या या प्रक्रियेत आलेले प्रत्यक्ष अनुभव कथन केलेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतीक विषयावर समाजाची सद्यःस्थिती काय आहे यावर सखोल विवेचन केले. या चर्चासत्रात TOR च्या नाट्य सिद्धांतावर सखोल विचारमंथन झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे डॉ. कुमार सप्तर्षी यांचे सहकारी अन्वर राजन, तेजस भालेराव तसेच मंजुळ भारद्वाज यांचे सहकारी कलावंत अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे हे सहभागी होते. सहभागी वक्तत्यांनी TOR च्या 'स्वराजशाला' उपक्रमाचे कौतुक केले, ज्याने राजकारणाला सात्विक आणि पवित्र धारा मानून सामाजिक जागृती घडवली. थिएटर ऑफ रेलेवन्सचा हा 33 वर्षांचा प्रवास सत्य आणि मानवतेच्या शोधाचा उत्सव आहे. पुण्यातील या चर्चासत्राने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, कला ही समाजाला बदलण्याची ताकद आहे. आता ही चळवळ प्रत्येक गावात, शहरात पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

बहुजन सौरभ शनिवार २३ ऑगस्ट २०२५ थिएटर ऑफ रेलेवन्स - सत्यपथावरील 33 वर्षाचा उत्सव आणि वैचारिक मंथन पुणे : आज सायंकाळी 6 वाजता, पुण्यातील गांधी भवन, कोथरूड येथे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि थिएटर ऑफ रेलेवन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कला सत्वाचा सत्यपथावरील 33 वर्षाचा प्रवास' या चर्चासत्राने रंगकर्म आणि सत्य यांचा अनोखा संगम अनुभवला. हा कार्यक्रम थिएटर ऑफ रेलेवन्सच्या 33 वर्षांच्या सृजनशील प्रवासाचा उत्सव ठरला, ज्याने कला ही केवळ करमणूक नसून सत्याचा शोध आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले. गांधी भवनात आयोजित या चर्चासत्राला रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि सामान्य प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाची सुरुवात मंजुल भारद्वाज, थिएटर ऑफ रेलेवन्सचे संस्थापक, यांच्या प्रेरक उद्बोधनाने झाली. त्यांनी TOR च्या 33 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेताना सांगितले की, 'कला ही सत्याशी संनाद करणारी प्रक्रिया आहे. थिएटर ऑफ रेलेवन्सने सत्याग्रह आणि प्रतिरोधाच्या भावनेतून समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि लाखो लोकांना स्वतःच्या अस्तित्वाचा बोध घडवला.' हे सांगताना त्यांनी त्यांच्या या प्रक्रियेत आलेले प्रत्यक्ष अनुभव कथन केलेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतीक विषयावर समाजाची सद्यःस्थिती काय आहे यावर सखोल विवेचन केले. या चर्चासत्रात TOR च्या नाट्य सिद्धांतावर सखोल विचारमंथन झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे डॉ. कुमार सप्तर्षी यांचे सहकारी अन्वर राजन, तेजस भालेराव तसेच मंजुळ भारद्वाज यांचे सहकारी कलावंत अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे हे सहभागी होते. सहभागी वक्तत्यांनी TOR च्या 'स्वराजशाला' उपक्रमाचे कौतुक केले, ज्याने राजकारणाला सात्विक आणि पवित्र धारा मानून सामाजिक जागृती घडवली. थिएटर ऑफ रेलेवन्सचा हा 33 वर्षांचा प्रवास सत्य आणि मानवतेच्या शोधाचा उत्सव आहे. पुण्यातील या चर्चासत्राने हे पुन्हा एकदा सिद्ध केले की, कला ही समाजाला बदलण्याची ताकद आहे. आता ही चळवळ प्रत्येक गावात, शहरात पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.



Wednesday, February 5, 2025

सत्याचा शोध घेणारं नाटक! 'द... अदर वर्ल्ड ' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव - प्रवीण गांगुर्डे

The ... Other World :  'द... अदर वर्ल्ड' नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. 

सत्याचा शोध घेणारं नाटका 'द... अदर वर्ल्ड' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव 

 'द... अदर वर्ल्ड' हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी, नाले, ओढे, झरे, समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून या नाटकाच्या विषयानुसार पर्यावरण आणि मानवतेच्या मुद्द्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.

"द... अदर वर्ल्ड" हे मंजुळ भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक जे मानवी अस्तित्व, निसर्ग आणि पंचतत्त्वांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकते. हे नाटक पारंपरिक कथाकथनापलीकडे जाऊन, प्रेक्षकांना या अनुभवात सहभागी करून घेतं. नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. आदी मानव ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमात्तेच्या जगातील आजच्या मानवापर्यंत नाटक प्रेक्षकांना प्रवास करवते. मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील असमतोल, आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान, तसेच आपल्या जगाची सद्यस्थिती या सर्व बाबींची जाणीव करून देण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम ठरते. हे नाटक केवळ गोष्ट सांगणारी कलाकृती नसून, ती आपल्याला अंतर्मुख करते. आपण ज्या निसर्गाचा भाग आहोत, त्याच्याशी आपले नाते काय आहे? आपण पुढील पिढ्यांसाठी कोणती दुनिया तयार करत आहोत? या मूलभूत प्रश्नांवर नाटक भाष्य करते. आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करते. 

दिग्दर्शन आणि सादरीकरण 

मंजुल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे ते नाटकाला केवळ मनोरंजनाच्या चौकटीत मर्यादित ठेवत नाहीत, तर ते प्रेक्षकांना विचार करायला लावतात. नाटकात रंगमंचाचा वापर अत्यंत कल्पकतेने केला आहे. प्रकाशयोजना, नैसर्गिक ध्वनी निर्मित संगीत आणि सकस अभिनय या सर्व घटकांचा प्रभावी संगम पाहायला मिळतो. नाटकात संवादांपेक्षा दृश्यात्मक संकल्पनांना अधिक महत्त्व दिलेले आहे. कलाकारांचे शरीराभिनय, नैसर्गिक शरीराच्या सर्वच अवयवांची हालचालींचा अत्यंत प्रभावीपणे केलेला वापर, अभिनय कौशल्य आणि प्रभावी दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांना हा एक अविस्मरणीय वेगळा अनुभव मिळतो. 

कलाकारांच्या अभिनयाविषयी 

कलाकारांनी आपल्या भूमिकांमध्ये अत्यंत ताकदीने प्राण ओतले आहेत. नाटकात कोमल खामकर, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे प्रांजल, समर, प्राणम्य या कलाकारांनी उत्तम अभिनयची कला सादर केली आहे. विशेषतः पंचतत्त्वांचे सादरीकरण करताना त्यांनी आपल्या देहबोलीद्वारे आणि हावभावांद्वारे या संकल्पनांना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडले आहे. स्वच्छ आणि तरल अभिनय करण्यासाठी कलाकारांनी भरपूर मेहनत घेतली आहे. यात सादर केलेला प्रत्येक संवाद कलाकार प्रत्यक्ष आदिवासी पाड्यात जाऊन राहून प्रत्यक्ष जगले आहेत, म्हणूनच त्यांच्या अभिनयातून वास्तविक परिस्तिथीचे दृश्य प्रेक्षकांपर्यंत परिणामकरकपणे पोहचवण्यात कलाकार यशस्वी झाले आहेत. संवादांची संख्या मर्यादित असली, तरीही कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे संवादांची कमतरता भासत नाही. त्यांच्या वेशभूषा, संवादफेक, आणि शरीरभाषा यामुळे संपूर्ण नाटकाचा परिणाम अधिक परिणामकारक वाटतो. 

संगीत ठरतेय अधिक प्रभावी ! 

या नाटकात वापरलेले पार्श्वसंगीत हे पारंपरिक वाद्यातून आणि अभिनेत्यांनी स्वतःच्या तोंडातून निर्माण केलेल्या ध्वनीतून, वेगवेगळ्या पक्षांचे आवाज, किलबिलाट, हवेचा आणि पाण्याचा ध्वनी फारच परिणाम करून गेला आणि कलाकारांनी आवश्यकतेनुसार निर्माण केलेले ध्वनी परिणाम वातावरणनिर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही प्रसंगी अभिनय, ध्वनी आणि प्रकाशाच्या साहाय्याने निर्माण होणारे दृश्य प्रभाव प्रेक्षकांना खरोखरच दुसऱ्या जगात घेऊन जातात. 

"द... अदर वर्ल्ड" हे केवळ रंगभूमीवरील प्रयोग नाही, तर हा एक अनुभव आहे. नाटकानंतर प्रेक्षक आपल्या भोवतालचा, पर्यावरणाचा आणि मानवी अस्तित्वाच्या नैतिकतेचा पुनर्विचार करू लागतात. माणूस जोडून वैचारिक रित्या एकत्र करून माणुसकीला वाचवण्यासाठी या नाटकाच्या माध्यमातून यश येत आहे. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने कलाकार आणि प्रेक्षकांच्या संवादाच्या माध्यमातून माणूस जोडला जातो आहे. आत्म विकास करण्यासाठी सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया या निमित्ताने पूर्ण झाली. ते केवळ एक कथा सांगत नाही, तर आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून कृती करण्यास उद्युक्त करते. 

- प्रवीण गांगुर्डे


सत्याचा शोध घेणारं नाटक! 'द... अदर वर्ल्ड ' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव   The ... Other World :  'द... अदर वर्ल्ड' नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे.   सत्याचा शोध घेणारं नाटका 'द... अदर वर्ल्ड' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव    'द... अदर वर्ल्ड' हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी, नाले, ओढे, झरे, समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून या नाटकाच्या विषयानुसार पर्यावरण आणि मानवतेच्या मुद्द्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.  "द... अदर वर्ल्ड" हे मंजुळ भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक जे मानवी अस्तित्व, निसर्ग आणि पंचतत्त्वांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकते. हे नाटक पारंपरिक कथाकथनापलीकडे जाऊन, प्रेक्षकांना या अनुभवात सहभागी करून घेतं. नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. आदी मानव ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमात्तेच्या जगातील आजच्या मानवापर्यंत नाटक प्रेक्षकांना प्रवास करवते. मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील असमतोल, आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान, तसेच आपल्या जगाची सद्यस्थिती या सर्व बाबींची जाणीव करून देण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम ठरते. हे नाटक केवळ गोष्ट सांगणारी कलाकृती नसून, ती आपल्याला अंतर्मुख करते. आपण ज्या निसर्गाचा भाग आहोत, त्याच्याशी आपले नाते काय आहे? आपण पुढील पिढ्यांसाठी कोणती दुनिया तयार करत आहोत? या मूलभूत प्रश्नांवर नाटक भाष्य करते. आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करते.   दिग्दर्शन आणि सादरीकरण   मंजुल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे ते नाटकाला केवळ मनोरंजनाच्या चौकटीत मर्यादित ठेवत नाहीत, तर ते प्रेक्षकांना विचार करायला लावतात. नाटकात रंगमंचाचा वापर अत्यंत कल्पकतेने केला आहे. प्रकाशयोजना, नैसर्गिक ध्वनी निर्मित संगीत आणि सकस अभिनय या सर्व घटकांचा प्रभावी संगम पाहायला मिळतो. नाटकात संवादांपेक्षा दृश्यात्मक संकल्पनांना अधिक महत्त्व दिलेले आहे. कलाकारांचे शरीराभिनय, नैसर्गिक शरीराच्या सर्वच अवयवांची हालचालींचा अत्यंत प्रभावीपणे केलेला वापर, अभिनय कौशल्य आणि प्रभावी दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांना हा एक अविस्मरणीय वेगळा अनुभव मिळतो.   कलाकारांच्या अभिनयाविषयी   कलाकारांनी आपल्या भूमिकांमध्ये अत्यंत ताकदीने प्राण ओतले आहेत. नाटकात कोमल खामकर, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे प्रांजल, समर, प्राणम्य या कलाकारांनी उत्तम अभिनयची कला सादर केली आहे. विशेषतः पंचतत्त्वांचे सादरीकरण करताना त्यांनी आपल्या देहबोलीद्वारे आणि हावभावांद्वारे या संकल्पनांना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडले आहे. स्वच्छ आणि तरल अभिनय करण्यासाठी कलाकारांनी भरपूर मेहनत घेतली आहे. यात सादर केलेला प्रत्येक संवाद कलाकार प्रत्यक्ष आदिवासी पाड्यात जाऊन राहून प्रत्यक्ष जगले आहेत, म्हणूनच त्यांच्या अभिनयातून वास्तविक परिस्तिथीचे दृश्य प्रेक्षकांपर्यंत परिणामकरकपणे पोहचवण्यात कलाकार यशस्वी झाले आहेत. संवादांची संख्या मर्यादित असली, तरीही कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे संवादांची कमतरता भासत नाही. त्यांच्या वेशभूषा, संवादफेक, आणि शरीरभाषा यामुळे संपूर्ण नाटकाचा परिणाम अधिक परिणामकारक वाटतो.   संगीत ठरतेय अधिक प्रभावी !   या नाटकात वापरलेले पार्श्वसंगीत हे पारंपरिक वाद्यातून आणि अभिनेत्यांनी स्वतःच्या तोंडातून निर्माण केलेल्या ध्वनीतून, वेगवेगळ्या पक्षांचे आवाज, किलबिलाट, हवेचा आणि पाण्याचा ध्वनी फारच परिणाम करून गेला आणि कलाकारांनी आवश्यकतेनुसार निर्माण केलेले ध्वनी परिणाम वातावरणनिर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही प्रसंगी अभिनय, ध्वनी आणि प्रकाशाच्या साहाय्याने निर्माण होणारे दृश्य प्रभाव प्रेक्षकांना खरोखरच दुसऱ्या जगात घेऊन जातात.   "द... अदर वर्ल्ड" हे केवळ रंगभूमीवरील प्रयोग नाही, तर हा एक अनुभव आहे. नाटकानंतर प्रेक्षक आपल्या भोवतालचा, पर्यावरणाचा आणि मानवी अस्तित्वाच्या नैतिकतेचा पुनर्विचार करू लागतात. माणूस जोडून वैचारिक रित्या एकत्र करून माणुसकीला वाचवण्यासाठी या नाटकाच्या माध्यमातून यश येत आहे. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने कलाकार आणि प्रेक्षकांच्या संवादाच्या माध्यमातून माणूस जोडला जातो आहे. आत्म विकास करण्यासाठी सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया या निमित्ताने पूर्ण झाली. ते केवळ एक कथा सांगत नाही, तर आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून कृती करण्यास उद्युक्त करते.   - प्रवीण गांगुर्डे
सत्याचा शोध घेणारं नाटक! 'द... अदर वर्ल्ड ' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव   The ... Other World :  'द... अदर वर्ल्ड' नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे.   सत्याचा शोध घेणारं नाटका 'द... अदर वर्ल्ड' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव    'द... अदर वर्ल्ड' हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी, नाले, ओढे, झरे, समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून या नाटकाच्या विषयानुसार पर्यावरण आणि मानवतेच्या मुद्द्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.  "द... अदर वर्ल्ड" हे मंजुळ भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक जे मानवी अस्तित्व, निसर्ग आणि पंचतत्त्वांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकते. हे नाटक पारंपरिक कथाकथनापलीकडे जाऊन, प्रेक्षकांना या अनुभवात सहभागी करून घेतं. नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. आदी मानव ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमात्तेच्या जगातील आजच्या मानवापर्यंत नाटक प्रेक्षकांना प्रवास करवते. मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील असमतोल, आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान, तसेच आपल्या जगाची सद्यस्थिती या सर्व बाबींची जाणीव करून देण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम ठरते. हे नाटक केवळ गोष्ट सांगणारी कलाकृती नसून, ती आपल्याला अंतर्मुख करते. आपण ज्या निसर्गाचा भाग आहोत, त्याच्याशी आपले नाते काय आहे? आपण पुढील पिढ्यांसाठी कोणती दुनिया तयार करत आहोत? या मूलभूत प्रश्नांवर नाटक भाष्य करते. आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करते.   दिग्दर्शन आणि सादरीकरण   मंजुल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे ते नाटकाला केवळ मनोरंजनाच्या चौकटीत मर्यादित ठेवत नाहीत, तर ते प्रेक्षकांना विचार करायला लावतात. नाटकात रंगमंचाचा वापर अत्यंत कल्पकतेने केला आहे. प्रकाशयोजना, नैसर्गिक ध्वनी निर्मित संगीत आणि सकस अभिनय या सर्व घटकांचा प्रभावी संगम पाहायला मिळतो. नाटकात संवादांपेक्षा दृश्यात्मक संकल्पनांना अधिक महत्त्व दिलेले आहे. कलाकारांचे शरीराभिनय, नैसर्गिक शरीराच्या सर्वच अवयवांची हालचालींचा अत्यंत प्रभावीपणे केलेला वापर, अभिनय कौशल्य आणि प्रभावी दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांना हा एक अविस्मरणीय वेगळा अनुभव मिळतो.   कलाकारांच्या अभिनयाविषयी   कलाकारांनी आपल्या भूमिकांमध्ये अत्यंत ताकदीने प्राण ओतले आहेत. नाटकात कोमल खामकर, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे प्रांजल, समर, प्राणम्य या कलाकारांनी उत्तम अभिनयची कला सादर केली आहे. विशेषतः पंचतत्त्वांचे सादरीकरण करताना त्यांनी आपल्या देहबोलीद्वारे आणि हावभावांद्वारे या संकल्पनांना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडले आहे. स्वच्छ आणि तरल अभिनय करण्यासाठी कलाकारांनी भरपूर मेहनत घेतली आहे. यात सादर केलेला प्रत्येक संवाद कलाकार प्रत्यक्ष आदिवासी पाड्यात जाऊन राहून प्रत्यक्ष जगले आहेत, म्हणूनच त्यांच्या अभिनयातून वास्तविक परिस्तिथीचे दृश्य प्रेक्षकांपर्यंत परिणामकरकपणे पोहचवण्यात कलाकार यशस्वी झाले आहेत. संवादांची संख्या मर्यादित असली, तरीही कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे संवादांची कमतरता भासत नाही. त्यांच्या वेशभूषा, संवादफेक, आणि शरीरभाषा यामुळे संपूर्ण नाटकाचा परिणाम अधिक परिणामकारक वाटतो.   संगीत ठरतेय अधिक प्रभावी !   या नाटकात वापरलेले पार्श्वसंगीत हे पारंपरिक वाद्यातून आणि अभिनेत्यांनी स्वतःच्या तोंडातून निर्माण केलेल्या ध्वनीतून, वेगवेगळ्या पक्षांचे आवाज, किलबिलाट, हवेचा आणि पाण्याचा ध्वनी फारच परिणाम करून गेला आणि कलाकारांनी आवश्यकतेनुसार निर्माण केलेले ध्वनी परिणाम वातावरणनिर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही प्रसंगी अभिनय, ध्वनी आणि प्रकाशाच्या साहाय्याने निर्माण होणारे दृश्य प्रभाव प्रेक्षकांना खरोखरच दुसऱ्या जगात घेऊन जातात.   "द... अदर वर्ल्ड" हे केवळ रंगभूमीवरील प्रयोग नाही, तर हा एक अनुभव आहे. नाटकानंतर प्रेक्षक आपल्या भोवतालचा, पर्यावरणाचा आणि मानवी अस्तित्वाच्या नैतिकतेचा पुनर्विचार करू लागतात. माणूस जोडून वैचारिक रित्या एकत्र करून माणुसकीला वाचवण्यासाठी या नाटकाच्या माध्यमातून यश येत आहे. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने कलाकार आणि प्रेक्षकांच्या संवादाच्या माध्यमातून माणूस जोडला जातो आहे. आत्म विकास करण्यासाठी सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया या निमित्ताने पूर्ण झाली. ते केवळ एक कथा सांगत नाही, तर आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून कृती करण्यास उद्युक्त करते.   - प्रवीण गांगुर्डे

सत्याचा शोध घेणारं नाटक! 'द... अदर वर्ल्ड ' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव   The ... Other World :  'द... अदर वर्ल्ड' नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे.   सत्याचा शोध घेणारं नाटका 'द... अदर वर्ल्ड' सौंदर्यपूर्ण पंचतत्वाचा रंगमंचीय अनुभव    'द... अदर वर्ल्ड' हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी, नाले, ओढे, झरे, समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. म्हणून या नाटकाच्या विषयानुसार पर्यावरण आणि मानवतेच्या मुद्द्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.  "द... अदर वर्ल्ड" हे मंजुळ भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक जे मानवी अस्तित्व, निसर्ग आणि पंचतत्त्वांच्या परस्परसंबंधांवर प्रकाश टाकते. हे नाटक पारंपरिक कथाकथनापलीकडे जाऊन, प्रेक्षकांना या अनुभवात सहभागी करून घेतं. नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. आदी मानव ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमात्तेच्या जगातील आजच्या मानवापर्यंत नाटक प्रेक्षकांना प्रवास करवते. मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील असमतोल, आधुनिक जीवनशैलीमुळे पर्यावरणाला होणारे नुकसान, तसेच आपल्या जगाची सद्यस्थिती या सर्व बाबींची जाणीव करून देण्यासाठी हे नाटक एक प्रभावी माध्यम ठरते. हे नाटक केवळ गोष्ट सांगणारी कलाकृती नसून, ती आपल्याला अंतर्मुख करते. आपण ज्या निसर्गाचा भाग आहोत, त्याच्याशी आपले नाते काय आहे? आपण पुढील पिढ्यांसाठी कोणती दुनिया तयार करत आहोत? या मूलभूत प्रश्नांवर नाटक भाष्य करते. आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करते.   दिग्दर्शन आणि सादरीकरण   मंजुल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे ते नाटकाला केवळ मनोरंजनाच्या चौकटीत मर्यादित ठेवत नाहीत, तर ते प्रेक्षकांना विचार करायला लावतात. नाटकात रंगमंचाचा वापर अत्यंत कल्पकतेने केला आहे. प्रकाशयोजना, नैसर्गिक ध्वनी निर्मित संगीत आणि सकस अभिनय या सर्व घटकांचा प्रभावी संगम पाहायला मिळतो. नाटकात संवादांपेक्षा दृश्यात्मक संकल्पनांना अधिक महत्त्व दिलेले आहे. कलाकारांचे शरीराभिनय, नैसर्गिक शरीराच्या सर्वच अवयवांची हालचालींचा अत्यंत प्रभावीपणे केलेला वापर, अभिनय कौशल्य आणि प्रभावी दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांना हा एक अविस्मरणीय वेगळा अनुभव मिळतो.   कलाकारांच्या अभिनयाविषयी   कलाकारांनी आपल्या भूमिकांमध्ये अत्यंत ताकदीने प्राण ओतले आहेत. नाटकात कोमल खामकर, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, प्रियंका कांबळे, नृपाली जोशी, तनिष्का लोंढे प्रांजल, समर, प्राणम्य या कलाकारांनी उत्तम अभिनयची कला सादर केली आहे. विशेषतः पंचतत्त्वांचे सादरीकरण करताना त्यांनी आपल्या देहबोलीद्वारे आणि हावभावांद्वारे या संकल्पनांना प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडले आहे. स्वच्छ आणि तरल अभिनय करण्यासाठी कलाकारांनी भरपूर मेहनत घेतली आहे. यात सादर केलेला प्रत्येक संवाद कलाकार प्रत्यक्ष आदिवासी पाड्यात जाऊन राहून प्रत्यक्ष जगले आहेत, म्हणूनच त्यांच्या अभिनयातून वास्तविक परिस्तिथीचे दृश्य प्रेक्षकांपर्यंत परिणामकरकपणे पोहचवण्यात कलाकार यशस्वी झाले आहेत. संवादांची संख्या मर्यादित असली, तरीही कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे संवादांची कमतरता भासत नाही. त्यांच्या वेशभूषा, संवादफेक, आणि शरीरभाषा यामुळे संपूर्ण नाटकाचा परिणाम अधिक परिणामकारक वाटतो.   संगीत ठरतेय अधिक प्रभावी !   या नाटकात वापरलेले पार्श्वसंगीत हे पारंपरिक वाद्यातून आणि अभिनेत्यांनी स्वतःच्या तोंडातून निर्माण केलेल्या ध्वनीतून, वेगवेगळ्या पक्षांचे आवाज, किलबिलाट, हवेचा आणि पाण्याचा ध्वनी फारच परिणाम करून गेला आणि कलाकारांनी आवश्यकतेनुसार निर्माण केलेले ध्वनी परिणाम वातावरणनिर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. काही प्रसंगी अभिनय, ध्वनी आणि प्रकाशाच्या साहाय्याने निर्माण होणारे दृश्य प्रभाव प्रेक्षकांना खरोखरच दुसऱ्या जगात घेऊन जातात.   "द... अदर वर्ल्ड" हे केवळ रंगभूमीवरील प्रयोग नाही, तर हा एक अनुभव आहे. नाटकानंतर प्रेक्षक आपल्या भोवतालचा, पर्यावरणाचा आणि मानवी अस्तित्वाच्या नैतिकतेचा पुनर्विचार करू लागतात. माणूस जोडून वैचारिक रित्या एकत्र करून माणुसकीला वाचवण्यासाठी या नाटकाच्या माध्यमातून यश येत आहे. नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने कलाकार आणि प्रेक्षकांच्या संवादाच्या माध्यमातून माणूस जोडला जातो आहे. आत्म विकास करण्यासाठी सर्व एकत्र येण्याची प्रक्रिया या निमित्ताने पूर्ण झाली. ते केवळ एक कथा सांगत नाही, तर आपल्याला जबाबदार नागरिक म्हणून कृती करण्यास उद्युक्त करते.   - प्रवीण गांगुर्डे

Reference:- https://marathi.hindustantimes.com/entertainment/the-other-world-theater-play-review-in-marathi-must-read-141738834627195.html

Monday, February 3, 2025

पृथ्वी, पर्यावरण, मानवता आणि स्वतःला वाचवूया ! - अश्विनी नांदेडकर ( थिएटर ऑफ रेलेव्हन्स रंगकर्मी )

पृथ्वी, पर्यावरण, मानवता आणि स्वतःला वाचवूया !
- अश्विनी नांदेडकर ( थिएटर ऑफ रेलेव्हन्स रंगकर्मी ) 



आपल्या सर्वांना कोण समानतेने बघत असेल, वागवत असेल तर तो आहे निसर्ग, माणसाव्या जीवनात कोणी दृष्टी देऊ शकते ती म्हणजे सृष्टी. पण आज माणूस हे विसरलाय की तोही निसर्गाचा एक भाग आहे. उगवता सूर्य, खळखळ वाहणारा झरा, संथ वाहती नदी, हंकार भरणारा समुद्र, पक्ष्यांचा गोड किलबिलाट, शिरशिरी भरणारा वारा हे ऐकूनच आपल्या मनाला किती सुखद अनुभव होतो. आपण अलगद निसर्गाच्या कुशीत जाऊन बसतो. पण आज हे फक्त कल्पनेतच उरले आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

सगळे मुद्दे मग राजकीय असू दे, आर्थिक असू दे की आणखी काही ते बाजूला पडतात ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती समोर उभी राहते. आपल्या समोर निसर्ग विक्राळ रूप धारण करतो त्यावेळी आपण कोण? याला काहीही अर्थ राहत नाही. अशावेळी एका क्षणात निसर्गासमोर आपण किती खुजे आहोत

याची जाणीव आपत्त्याला होत राहते. निसर्ग विलोभनीय पण त्याची छेडछाड केली तर तितकाच भयंकर, मग केदारनाथची घटना असू की आताची वायनाडची. कुठे ना कुठे या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत.

हळूहळू विचारांच्या प्रवाहात आणले. आणि आपली सुरुवात कुटून झाली होती? म्हणजेच अश्मयुगीन कालखंडापासून आपण मानव उत्क्रांतीचा इतिहास रचला. आपल्यात शोध प्रवृत्ती होती. कुतूहल होते. या शोधाला विचार करणे ही माणसाची ओळख बनली. विचारांच्या ताकदीने माणसाने दसदिशा पादक्रांत केल्या. निसर्गातील नवीन शोधांना रहस्यांचा शोप घेतला ज्याला आपण विज्ञान म्हणतो. त्या शोधाला त्याने स्वतःच्या सुखासाठी उपयोगात आणले. वैचारिक प्रगती करता करता माणूस भौतिक सुखात अडकायला लागला तिथे ही उत्क्रांती एका विध्वंसाकडे वळली आणि पृथ्वीच्या विनाशाची सुरुवात झाली.

महत्वकांक्षी माणसाने समाधान सोडून लालसा आपलीशी केली. ज्या पंचतत्वाने स्वतःची निर्मिती झाली त्याच पंचतत्वांवर कब्जा करण्याची प्रवृत्ती माणसात रुजली.

वसुधैव कुटुंबकम आपण बोलतो पण खरंच तसे वागतो का? ही परती माझी, सगळे जग माझे कुटुंब पण आपण आपल्याच जमिनीशी बेइमानी करतो. आपली म्हणणारी माणसं आता आहेत तरी कुठे? आज अंदाधुंद विकासासाठी चाललेली झाडतोड, नदीच्या नदी विकली जाणे, जमिनीखालील खनिज आणि पाणी शोषून घेतले जात आहे त्यासाठी जमिनीचा आणि नैसर्गिक ठेवींचा विध्वंस होतोय. माची प्रत्येक सामान्य माणसाला जाणीव नक्कीच आहे. पण त्या जाणिवेचे तो काहीच करत नाही किंबहुना त्याला काही करताच येत नाही. मी माझं आणि माझा परिवार गा चौकटीपुढे माणसाला काहीच दिसत नाही. आज राजनैतिक गोष्टी असू दे किंवा सामाजिक असू दे तावातावाने आपल्याच माणसाशी भांडणारी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. पण पर्यावरणासाठी जिथे आपण राहतो त्या परिसरातील स्वच्छ्ता, निसर्ग पासाठी कोणीही

पुढे येत नाही. निसर्ग असमानता दाखवत नाही अगदी श्रीमंत असो किंवा गरीब, राजा असो किंवा रंक त्याच्या विध्वंसापुढे सर्वच थिटे पडतात. आपणा सर्वांनाच हे चांगल्या रीतीने माहिती आहे की, आपण सर्वात शेवटी जी शांतता आणि समाधान शोधतो ती निसर्ग भरभरून आपल्याला देतो. आपला थकवा,

आपला मूड निसर्गाच्या सात्रिध्यात चांगला होतो. असे असतांनाही माणसाने सिमेंटचे जंगल आपलेसे केले. निसर्गाच्या विरोधात वागणे सुरू केले. झाडे लावा झाडे जगवा आपण एक झाड तर लाबू, या केवळ ओळी आहेत, पण जंगल कसे निर्माण करणार. निसगांच्या चक्रांना

कसे ठोक करणार? आज प्रत्येक व्यक्तीची प्राथमिकता फक्त भौतिक सुखाबी आहे. सायं उदाहरण घेतले की सिगारेट किंवा गुटख्याच्या पाकिटावर चित्रसहित मृत्यूची सूचना दिलेली असते तरीही माणूस ते विष खायला कमी करत नाही. कारण त्याची प्राथमिकता क्षणिक सुखाची आहे. निसर्गाबद्दल माणूस असाच वागतोय.

पण सुरुवात करावीच लागणार आपल्या पुढे येणाऱ्या पिढीला उत्तर देण्यासाठी. म्हणूनच थिएटर ऑफ रेलेवन्सचे रंगकर्मी घेऊन येत आहे नाटक छहरा... जॉहशी श्रिय, युरोप मध्ये जर्मनीतील प्रमुख शहरांमध्ये या नाटकाने हुंकार भरली, भारतीय मातीतून जन्मलेला सिद्धांत थिएटर ऑफ रेलेवन्सचे हे नाटक प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मुळाशी घेऊन जात निसर्गाच्या जाणिवेचा स्पर्श देण्यासाठी सज आहे. युरोप मध्ये गाजलेले आणि आता भारतात सर्वत्र प्रस्तुत होण्यासाठी सज्ज थिएटर ऑफ रेलेवन्स चे नवीन नाटक 'The.. Other world. पाचे लेखक दिग्दर्शक आहेत मंजुल भारद्वाज.