Pages

Sunday, April 28, 2019

पाणी मानवाचा नैसर्गिक अधिकार


आपलं महानगर 
दिनांक - २८ एप्रिल २०१९ 



भारतातून
सुरू झालेला पाण्याचा प्रवास युरोपपर्यंत संपन्न झाला.. ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटरपाण्याच्या खाजगीकरणाचा विरोध करणार्‍या या नाटकाचे युरोपमधील चार देशात 26 प्रयोग झाले आणि या नाटकाच्याच प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही युरोपियन मुलांसोबतयुवारंगाकर्मींसोबत, तिथल्या शिक्षकांसोबत 29 नाट्यशिबिरे घेतली. ६६ दिवस युरोपच्या रंगभूमीवर सादर झालेले हे नाटक मानवी जीवनात पाण्याचे महत्व पटवून देतच सोबत अनेक राजकीय मुद्यांवर प्रहार करते.

पाणी हेच जीवन आहे.
मानवाच्या निर्मितीपासूनच पाणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे

आईच्या गर्भातही पाणी असतेआणि मृत्यूनंतरही मोक्षासाठी अस्थीविसर्जनही याच पाण्यात होते

मानवी सभ्यतेच्या उत्क्रांती काळात पाणी हे मानवाच्या प्रगतीचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे.. म्हणून आपण मानवी सभ्यतेचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की, मानवी संस्कृती ही नदीकाठी वसलेली आढळते..युफ्रेटीस, नाईल आणि सिंधू ही त्याची उदाहरणे आहेत..
एकूणच भारतीय वैश्विक स्तरावरील संस्कृतीत पाण्याचा प्रवाह आणि प्रवास सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आयमांनी घडत गेलेला उलगडत जाणारा आहे.

भारतातही पाणी आणि संस्कृतीचे नाते जवळचे आहे. आपण भारतीय आजही घरी आलेल्या पाहुण्यांना पहिले पाणी देतो..हॉटेलमधील उदाहरण घ्या. टेबलावर बसल्याक्षणी पाणी येते.. कुठेही घोटभर कोणी पाणी मागितलं तर शक्यतो कोणी नाही म्हणत नाही..ही आहे आपली भारतीय संस्कृती. आपल्या आजीआजोबांच्या काळात थोडं मागे जाऊन पाहिले की तुम्हाला आठवेल आपल्याकडे पूर्वी जागोजागी पाणपोई होत्या. ज्यात स्वच्छ-शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळायचे.. आज ही स्थिती काही ठिकाणी गावी गेल्यावर पाहायला मिळते की, बाहेर पाण्याचे माठ ठेवलेले असतातपण शहरांत हेच पाणी 20 रुपये बॉटलमध्ये विकत मिळते..विचार करा, पाणी जे काहीही शुल्क देता मिळत होते त्याच्यासाठी आज पैसे मोजावे लागतातहे खाजगीकरण आले कुठून ? याचा कधी विचार केला..

हल्ली एक संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहेकी दक्षिण आफ्रिकेतील एका शहरात तेथील सरकारने थेट नागरिकांना सांगितले की, आम्ही पाणीपुरवठा करू शकणार नाही..आता यात किती तथ्य आहे माहीत नाही, पण समजा अशी स्थिती खरंच उभी ठाकली तर ?
पाण्याविना पृथ्वीवर मानव जीवनाची कल्पनाही करवत नाही..आज आपण चंद्रापासून ते मंगळापर्यंत त्या ग्रहांवर पाण्याचा साठा आहे किंवा नाही याचा शोध घेत आहोत. पाणी हा आपला नैसर्गिक हक्क आणि गरज आहे. त्याचे खाजगीकरण होत आहे, हे सर्व आता जाणलं नाही तर भविष्यात पाणी या विषयावर युद्ध होईल.

पाणी हा आपला नैसर्गिक आणि जन्मसिद्ध अधिकार आहे. जगभरात पाण्याच्या खासगीकरणाचे धोरण सुरू आहे आणि सामाजिक आणि राजकीय धोरणांमुळे सामान्य व्यक्ती पाण्यापासून वंचित आहे.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखितदिग्दर्शितड्रॉप बाय ड्रॉप वॉटर (इंग्रजी नाटक)” या नाटकात वरील विषयांना थेट मांडले आहे.
नाटक हेच दाखवीत पाणीबचत, सुरक्षा जलसंवर्धन ही मूल्य मानवी संस्कृतीमध्ये रुजवत आहे. पाण्याची उत्पत्ती, उत्सव आणि विध्वंस असा प्रवास या नाटकाचा आहे .

भारतातून सुरू झालेला पाण्याचा हा प्रवास युरोपपर्यंत संपन्न झाला.. ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटरपाण्याच्या खाजगीकरणाचा विरोध करणार्‍या या नाटकाचे युरोपमधील चार देशात 26 प्रयोग झाले आणि या नाटकाच्याच प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही युरोपियन मुलांसोबतयुवारंगाकर्मींसोबत, तिथल्या शिक्षकांसोबत 29 नाट्यशिबिरे घेतली.
६६ दिवस युरोपच्या रंगभूमीवर सादर झालेले हे नाटक मानवी जीवनात पाण्याचे महत्व पटवून देतच सोबत अनेक राजकीय मुद्यांवर प्रहार करते.

जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले आणि पैसा हा जागतिक व्यवहाराच्या केंद्रस्थानी आला.

पाण्याच्या खाजगीकरणासाठी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि मल्टीनॅशनल कंपन्या या सगळ्या आग्रही आहेत. त्यांनी पाणी या नैसर्गिक अधिकारावर कब्जा केला आहे. विकासाच्या नावाखालीपुनर्वसनाचे आश्वासन देऊन यांनी नद्यांच्या नद्या विकत घेतल्या, हे विकत घेतलेले पाणी मुंबई सारख्या शहरांना पुरवले गेले, पण तिथल्या स्थानिक लोकांना त्या नद्यांचे पाणी घेण्यासाठी पाबंदी घातली. विकासाच्या नावाखाली अंधाधुंधीकरण होते आहे, त्यामुळे गावे नष्ट होत आहेत, नद्या नष्ट होत आहेतआणि शहरांमध्ये राहणारे लोक साधा हा देखील विचार करत नाहीत की, आपला विकास दुस-यांच्या शोषणातून तर होत नाही ना ?

विकासाच्या नावाने उद्योग धंदे, इंडस्ट्री सुरू झाल्याआपल्याकडच्या समुद्र, नद्यांची, सरोवरांची स्थिती आपण पाहतोच, जगभरातही ती तशीच आहे. पाणीसाठे झपाट्याने कमी होताहेत. वाढणार्‍या तापमानामुळे वाफ होण्याचे प्रमाण वाढले आहे. जे काय पाणी शिल्लक आहे ते औद्योगिक, घरगुती तसेच रासायनिक उत्सर्जनामुळे प्रदूषित होत आहे.

जमिनीखाली पाणी आहे, पण भांडवलदारांनी जमिनीखालचे पाणी शोषून घेतले आणि पेप्सी, कोकाकोला यांसारखे पेय तयार करण्यासाठी फॅक्टरी उभ्या केल्या आणि पेय विकली जातात गावांच्या जीवावर उभ्या राहिलेल्या शहरांमध्ये.
भूजलाचा दर घसरला आहेपाणी कमी त्यामुळे माती उपजाऊ, सुपीक नाही एकूणच निसर्गाचे चक्रच बिघडले..केवळ स्वतःच्या नफ्या आणि फायद्यासाठी या भांडवलदारांनी संपूर्ण पृथ्वीला वेठीस धरले आहे.
आपली भारतीय संस्कृती किती विविधतेने नटलेली आहे. आपण हा विचार करायला हवा की विकासाच्या नावाखाली ती उत्पादित तर बनत नाही ना !
आपल्यासाठी म्हणजे मानवासाठी पृथ्वी हे एकमेव ठिकाण आहे जिथे आपण राहू शकतो.

आपलं मानवी शरीर अग्नी, वायू, माती, आकाश आणि पाणी पंचतत्वाने निर्माण झाले. बाकीची चार तत्वे तर ब्रह्मांडामधील सर्व ग्रहांवर आहेत. पाणी फक्त पृथ्वीवर आहेआपल्या पृथ्वीवरील या अमूल्य ठेव्याचे आपण काय केले..अमूल्य अशा पाण्याचे महत्त्व आपण जाणतो का ? याचा विचार करूया !

थेंबाथेंबात जीवन आहेम्हणून थेंब थेंब वाचवूया !

पाणी हा जन्मसिद्ध नैसर्गिक अधिकार आहे, म्हणून पाण्याचे खाजगीकरण थांबवूया !

सायली पावसकर (रंगकर्मी)




Sunday, April 21, 2019

आम्ही आदिवासी..देशाचे मूळ निवासी



आपलं महानगर 
दिनांक - २१ एप्रिल २०१९ 






आम्ही आदिवासीदेशाचे मूळ निवासी, या थिएटर ऑफ रेलेवन्सने आयोजित केलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या आदिवासी मुलांनीपर्यावरण संतुलन आणि संरक्षण आधारित विकासया विषयावर नाटक सादर केले. आदिवासींच्या हक्काचे नैसर्गिक स्रोतांचे शोषण, विस्थापितांची बिकट अवस्था हे अनुभव मुलांच्या जीवनातील होते. नाटकाच्या माध्यमातून ते कसे मांडायचे हे मुलांनी अनुभवले.


आम्ही आदिवासी
मंजुल भारद्वाज

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी
देशाचे मूळ निवासी
आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी

आम्ही जंगलात राहतो
होहो
आम्ही डोंगरावर फिरतो
होहो
आम्ही वाघासोबत बागडतो
होहो
आम्ही निडर, बहादूर, धाडसी

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी
देशाचे मूळ निवासी

तुम्ही पाणी आमचा चोरता
मग चार टाळकी बसता
मग तुम्हीच कायदा काढता
आणि आमची जागा लुबाडता
आणि म्हणतात कसे
लोकशाहीआहे

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी
देशाचे मूळ निवासी

आम्ही झाडांना सांभाळतो
होहो
आम्ही निसर्गाला जपतो
होहो
आणि आम्हीच उपाशी मरतो
आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी
देशाचे मूळ निवासी
आणि आम्हीच मरतो उपाशी

असा या देशाचा कारभार
लोकं म्हणे शिकले
शिकून लय मोठे झाले
बाजार आणलाय
शहर मोठे मोठे झाले
मोठा मोठा पगार घेतात
लाख लाख घेतात
बंगला पण बांधलाय
मोटारगाडी आणलीय

आणि ….
मोठा आजार घेतलाय
आजार बाजार व्यापार
अरे बंद करा बंद करा
जीवनाचा व्यापार बंद करा

केला निसर्गाचा सत्यानाश
आणि याला हे म्हणतात
हा बघाविकास

आम्ही आदिवासी आदिवासी आदिवासी
देशाचे मूळ निवासी

कॉम्प्युटर आणलाय
म्हणे जग एक झालं
एक झालं म्हणजे काय हो ?
जागतिकीकरण
आणि यात आम्हा आदिवाशांचे मरण
पर्यावरणाची बोंबाबोंब !!

मायेचं तापमान वाढलंय
निसर्गचक्र बिघडलंय

चला जागे होऊया
चला एक होऊया
घडवूया आपलं अस्तित्व
करूया यांच्या विकासाचा
अस्त अस्त अस्त

आमचे जीवन सुंदर आहे! या आरोळ्यांनी दुमदुमलेला निसर्ग, थंडगार वारा.. कोवळं ऊन..
पर्वतरांगा..

टेकड्या चढताना, एक जागी ऊन तर लगेच दुसर्‍या बाजूला सावली असा ऊन सावलीचा खेळ बघताना डोळे अगदी भारावून जायचे.. डोंगरांच्या मध्यभागी एक छोटेसे गाव, गावातली निरागस माणसं आणि आमच्याभोवती सतत किलबिलणारी मुलं.. हो, मी एका आदिवासी पाड्याचा अनुभव तुम्हाला सांगत आहे.

आदिवासी”, नावातच अर्थ आहे. आदीकाळापासून आपल्या निसर्गाचे, आपल्या गावाचे, आपल्या देशाचे अस्तित्व टिकवण्यासाठी वसलेली लोकं. या माणसांचा एकच धर्म- माणुसकी, आयुष्याचे एकच ध्येय-श्रम आणि समाधान आणि एकच कर्तव्य-निसर्गाचे संरक्षण. अशी ही मानव प्रजाती, सध्याच्या काळ चक्रातून बाहेर फेकली गेली, असे का ? उत्तर अगदी सोपं आहे – “जागतिकीकरण”. या जागतिकीकरणाने विश्वाला एका मखमली जाळ्यात गुंडाळून, आदिवासींना अलगद अलिप्त केले. आर्थिक सुधारणा, विकास आणि पायाभूत सुविधा, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाने मूलभूत मानवी अधिकारांचे हनन केले. ज्या जल, जंगल आणि जमिनीचा आयुष्यभर हे आदिवासी आपले जीवन समजून जगत आले त्यावरच भांडवली ताकदींनी कब्जा केला.

अशात आम्ही आदिवासीदेशाचे मूळ निवासी. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सहभागींनीपर्यावरण संतुलन आणि संरक्षण आधारित विकासया विषयावर नाटक सादर केले.

आदिवासींच्या हक्काचे नैसर्गिक स्रोतांचे शोषण, विस्थापितांची बिकट अवस्था हे अनुभव मुलांच्या जीवनातील होते; पण नाटकाच्या माध्यमातून यांना कसे मांडायचे हे मुलांनी अनुभवले ..आपल्या विनाशाचा जागतिकीकरणाशी / विकासाशी थेट संबंध आहे. कारण शहरातून येणारे.. मोटरगाडीतून फिरणारे so called श्रीमंत असतात असा आदिवासींचा गैरसमज होता; पण चार दिवस चालणार्‍या थिएटर ऑफ रेलेवन्स कार्यशाळेमधून त्यांनी हे जाणले की .. श्रीमंती ही पैशाने नसतेयाविक्री आणि खरेदीच्या काळात आपण जगण्यासाठी कुठलीच गोष्ट विकत घेत नाही आणि म्हणूनच आपण श्रीमंत आहोत, आपले जीवन खूप सुंदर आहे. आपण आदिवासी जंगलात राहतो, डोंगरात फिरतो, सुंदर निसर्गासोबत जगतोनिसर्गाला आपण जपतोशहरातल्या उपभोग घेणार्‍यांसारखे ओरबाडत नाहीनिव्वळ स्वतःचा विकास करणे आणि स्वतःच्या जगण्यासाठी निसर्गाचा र्‍हास करणे ही संस्कृती आम्हा आदिवासींमध्ये नाहीआणि म्हणूनच आदिवासींचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे.

आपल्या हक्कांसाठी आता आपल्यालाच लढावे लागणार याची जाणीव या नाट्य कार्यशाळेत मुलांनी अनुभवलीमाझ्या हक्कांसाठी आता मला लढावे लागणारआम्ही आदिवासी …. या नावातच माणसाचे अस्तित्व आहे. आदी काळापासून वसलेली माणसं, त्यांची निसर्गाशी, पशु पक्ष्यांशी असलेली सांगड , माणुसकीच्या तत्वाला जगवणारी आहे. माझ्याकडे निसर्गाची विपुल साधन संपत्ती आहेतिचा विनाश करता नियोजन करून मी समृद्ध होण्याची कला आत्मसात करण्याची संकल्पना या कार्यशाळेत समजलीया मुलांमध्ये कला जन्मजात भिनलेली असते आणि निसर्गाशी जवळ असलेला कलाकार हा नेहमीच विशुद्ध असतो, ही जाणीव या कार्यशाळेत झाली. या प्रक्रियेतून मुलांना नेतृत्वाची जाणीव झाली. काहींनी पहिल्यांदाच आपला आवाज मनापासून ऐकला. एका मुलाचा अनुभव तर असा होता की त्याचे वडील पावसाळ्यात सगळ्या परिवारासोबत शेती करतात; पण उन्हाळ्यात पाण्याअभावी शेती करता येत नसल्याने शहरात वेठबिगारी गवंडीचे काम करतात. मालक असलेला आदिवासी शहरात जाऊन गुलाम बनतो. हाच प्रश्न या मुलांनी या नाटकात मांडला आणि याच प्रक्रियेत याचे उत्तरही शोधले. एकत्र येऊन काम करण्याची प्रेरणा मिळवली.” आम्ही आमच्या जमिनी कारखान्यासाठी देणार नाही” , ” ही जागा आमची आहे” , ” आम्ही उपाशी मारणार नाही !” , असे नारे लावत या आदिवासी मुलांनी एकमेकांची सोबत देऊन , स्व-अस्तित्वासाठी लढा देणारी टीम तयार केली.

जननीचा (पृथ्वीचा) ताप प्रत्येक क्षणी वाढतो आहे. आपली धरती आता संकटात आहे. मध्यमवर्गीय लोकांचा विकास व्हावा म्हणून मोठमोठी झाडे, जंगले धडाधड कापली जात आहेत. संपूर्ण देशभरात दुष्काळ आता तोंडाशी येऊ लागला आहे. शेतकर्‍यांची अवस्था विकासाचा जप करणार्‍या अंध भक्तांसमोर आहे. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या 27 मुला-मुलींनीपर्यावरण संतुलन आणि संरक्षणविषयावर आपली प्रस्तुती सादर केली.

माणसापासून माणुसकी आणि प्रकृतीपासून नैसर्गिक संसाधने हिसकावून घेणारे हेजागतिकीकरण ” – विषमता आणि अन्यायाचे वाहक आहे. हवा, पाणी, जंगल आणि माणुसकीला नष्ट करणारा या विकासाचा पाया इतका मजबूत झाला आहे की आता पृथ्वीचा ताप वाढत चालला आहे. अशा वेळी लोकशाही व्यवस्थेचा आवाजमीडियापण भांडवलदारांच्या मांडीवर बसून नफा कमवत आहे.. पुरातन काळापासून आदिवासीजल, जंगल आणि पर्यावरणाचेसंतुलन आणि संरक्षणाचे रखवालदार राहिले आहेत. या कार्यशाळेत नाटकाच्या माध्यमातून या कल्पनेला पुनर्स्थापित केले गेले की, विकल्या जाणार्‍या फिल्मी लोकांऐवजी, ‘आदिवासीपर्यावरणाच्या संतुलन आणि संरक्षणाचेखरे आणि टिकाऊ दूतआहेत.

-अश्विनी नांदेडकर. (रंगकर्मी)





Sunday, April 14, 2019

मार्केटिंग टूल झाले पथनाट्य


आपलं महानगर 
दिनांक - १४ एप्रिल २०१९ 



पथनाट्य मोठ्या आव्हानांसमोर तीव्रतेने उभे राहते आणि पुन्हा एका प्रकारे हायबरनेशनमध्ये निघून जाते. जेव्हा केव्हा एखादी बिकट परिस्थिती समोर उभी ठाकते तेव्हा पुन्हा पथनाट्य उभारून येते. कारण हे पीडितांच्या संघर्षाचे शस्त्र आहे. हा असा लाव्हा आहे जो आतल्या आत धुमसत राहतो; पण विझत नाही. १२ एप्रिल या राष्ट्रीय पथनाट्य दिवसानिमित्ताने शुद्ध क्रांती, जनआंदोलनापासून पथनाट्य आता एक मार्केटिंग टूल कसे झाले आहे, याचा आढावा घेणारा हा लेख.

पथनाट्य म्हणजे काय ?

 पथनाट्य आधुनिक शब्द आहे. रस्त्यांवर मैदानात खेळल्या जाणार्‍या (वर्तमानातील राजनैतिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक चेतना निर्माण) नाटकांना पथनाट्य म्हणतात.

एका सामान्य माणसाचे नाटक ज्यात, (आम आदमी) समस्यांचे चित्रण असावे जे भरचौकात खेळले जाईल.
एक नाटक जे आपल्या पूर्ण नाटकीय क्षमतेसाठी प्रत्येक नाक्या नाक्यावर खेळले जाईल.
 जन संघर्ष चेतना जागृत करण्याचे नाव आहे पथनाट्य
आव्हानांना आव्हानांसारखे स्वीकार करण्याचे नाव आहे पथनाट्य
गरीब, शोषित, पीडित आणि सर्वसामान्यांचा आवाज आहे पथनाट्य

पथनाट्याचा उद्देश
) विशिष्ट स्थितींचे राजनैतिक विश्लेषण करून प्रेक्षकांच्या चेतनेला दिशा देणे.
) असे नाटक करणे ज्याचे गांभीर्य, सखोलता आणि आयु तेवढी मोठी असेल जेवढी आपल्या सामाजिक समस्यांची सखोलता, गांभीर्य आणि आयु.
) असे नाटक जे लगेचच जनतेच्या दुःखाला, वेदनेला एक औषधी ठरेल.
) सामान्य माणूस ज्या नाटकाचा नायक असेल त्या नाटकांना प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवून जनसंघर्ष आणि चेतनेचे निर्माण करणे.
400 वर्षांचा औद्योगिक क्रांतीचा इतिहास आहे.

औद्योगिक क्रांतीनंतर कामगारांना आपला हक्क मिळवून देण्यासाठी पथनाट्याची क्रांतिकारक भूमिका राहिली आहे.
याचं कारण असं होतं की, मजदुरांनी, कामगारांनी आपल्या हक्काच्या लढाईसाठी नाट्यकलेच्या आत लपलेल्या भावना आणि क्रांतीच्या लाव्ह्याला समजले आणि नाटकाला मनोरंजनापर्यंत मर्यादित ठेवणार्‍या भांडवलशाही वृत्तीपलीकडे क्रांतीचे शस्त्र बनवले आणि नाटकाच्या एका नवीन रूपाला जन्म दिला ज्याला पथनाटक म्हटले गेले.

म्हणून नाटकाचा जन्मदाता दुसरा कोणी नाही तर मजदूर आहे, तो कामगार आहे ज्याने सामंती व्यवस्थेच्या लोहाला स्वीकारलं आणि लढून, संघर्ष करून आपल्या अधिकारांना मिळवलं. कारण मजदूर आपली गोष्ट करत होते, आपले मुद्दे मांडत होते, एका व्यवस्थेच्या विरोधात ते लढत होते. ती लढाई राजनैतिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक लढाई होती. व्यवस्थेच्या आमूलाग्र बदलाची होती, म्हणून पथनाट्यात परिवर्तनाचा लाव्हा असतो, आहे आणि न्याय, समता समानता यांची वैचारिक प्रतिबद्धता आहे.
म्हणजे पथनाट्य सर्वहारा द्वारा सृजित अन्यायाच्या विरुद्ध लढणारे शोषितांचे, पीडितांचे शस्त्र आहे. आज जे आपण पाहतो की ऑफिस कारखाने घर कुठेही काम किंवा श्रम याचे तास, शिफ्ट किंवा वेळ निर्धारित झाली आहे, ते पथनाट्याचे माध्यम घेऊन मजुरांनी केलेल्या संघर्ष आंदोलनामुळेच.
युरोपमध्ये निर्माण झालेली औद्योगिक क्रांती ज्या ज्या ठिकाणी विस्तारली त्या त्या ठिकाणी पथनाट्य खेळले गेले आणि ही नाट्य पद्धत, शैली जगभरात पसरली. औपनिवेशिक देशांनी या नाट्य शैलीचा उपयोग आपल्या स्वातंत्र्याच्या संघर्षासाठीदेखील केला आणि त्यात ते यशस्वी झाले. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात कामगार आणि शेतकर्‍यांनी या नाट्यशैलीचा उपयोग केला.
पथनाट्य मोठ्या आव्हानांसमोर तीव्रतेने उभे राहते आणि पुन्हा एका प्रकारे हायबरनेशनमध्ये निघून जाते. जेव्हा केव्हा एखादी बिकट परिस्थिती समोर उभी ठाकते तेव्हा पुन्हा पथनाट्य उभारून येते. कारण हे पीडितांच्या संघर्षाचे शस्त्र आहे. हा असा लाव्हा आहे जो आतल्या आत धुमसत राहतो; पण विझत नाही.
पथनाट्य आपल्या जन्मापासून आतापर्यंत अनेक दिव्यातून गेले आहे. शुद्ध क्रांती, जनजागरण, जन आंदोलनचळवळीपर्यंतचा हा प्रवास आता निव्वळ एक मार्केटिंग टूल झाला आहे.
जसजसा काळ बदलत गेला भांडवलशाही व्यवस्थेने सर्वहाराची व्यवस्था पाडण्यासाठी, एक ध्रुवीय जगाची उभारणी करण्यासाठी, जागतिकीकरणाचे अनोखे षड्यंत्र रचले आणि जगभरातील संघटित कामगार संपविण्याचा कट केला आणि त्यांना दिहाडी मजदूर बनवले. एकाच झटक्यात विज्ञानाच्या उदयाने विकसित झालेल्या तंत्रज्ञानाने संपूर्ण जगाला एका गावात रूपांतरित करण्याचे आणि त्याचे शोषण करण्याच्या प्रणालीची निर्मिती केली. बिकट परिस्थितीत पथनाट्याच्या समोर मानवता आणि मानवी व्यवस्थेचे संरक्षण करण्याचे प्रचंड आव्हान होते.

चला या आव्हानांना समजू.

1) जागतिकीकरण :

जागतिकीकरणाने जगातील जैविक आणि भौगोलिक विविधतेला नष्ट केले आहे करत आहे. या जागतिकीकरणाचा चेहरा अत्यंत विद्रूप आहे.
संप्रेषणस्मार्टफोन, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, एस.एम.एस आणि इतर टेक्नॉलॉजी आणि विकल्पांचा विकास झाला, परंतु संप्रेषण प्रगाढ झाले का, की विखंडित झाले? विचार संप्रेषित होतात का? जेव्हा की विचारांच्याच कब्रस्तानावर उभे राहिले आहे जागतिकीकरण! बाजार बाजार बाजार सर्व खरेदी करा. इथे संप्रेषण तंत्राने नाती, संबंध, आपलेपणा, आनंद, सर्व विकले जाते बस तुम्ही विकत घ्या.. हा सभ्य दुनियेचा आर्थिक धर्म आहे. जीवन विका आणि खरेदी करा, सर्व काही खरेदी करा आणि विका, हे जगातील तानाशहांचे जगाच्या कल्याणासाठी, वैज्ञानिक युगातील मंत्र आणि सूत्र आहे.

2) पर्यावरण आणि प्राकृतिक संसाधने

या संकल्पनेत मुळात माणूस आणि माणुसकी श्रेष्ठ नाही, सभ्यता श्रेष्ठ नाही आहे. अर्थात फक्त नफा फायदा आणि व्यापार श्रेष्ठ आहे. या व्यवस्थेचे मूल्य मानवाच्या गरजा पूर्ण करणे नाही, उलट त्याची लालसा आणि हव्यासाला वाढवणे आहे. समता, समानता, समृद्धीच्या नावावर विषमता, अलगाव आणि हिंसा हे या व्यवस्थेच्या मुळाशी आहे जी उपभोगवादाच्या खांद्यावर बसून पृथ्वीला नष्ट करत आहे आणि पृथ्वीचा श्रेष्ठ जीव मानव आपल्या लोभापायी आपल्याच सहसोबती मानवाचा, पृथ्वीच्या इतर बाकी जिवांचा, पर्यावरण आणि जीवनासाठी उपयुक्त प्राकृतिक संसाधनांचा स्वतःला गिळंकृत करण्यासाठी उभा आहे. सभ्यता, संस्कृती असे गोडवे गाणारा माणूस केवळ आणि केवळ खरेदी विक्रीची वस्तू बनला आहे.

3) ब्रूट पावर

जिसकी लाठी उसकी भैस या वाक्याला अंमलात आणण्याचा मंत्र आहे. नरसंहार करणार्‍या अनु हत्यारांच्या विशाल जोरावर बसलेला देश अमेरिका त्याचे मित्र देश जगाला शांततेच्या नावावर धमकावतात डब्ल्यूटीओमधील सर्व व्यापार मसुद्यांवर स्वाक्षरी करतात. जगातील पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक स्त्रोतांचा नाश करण्यासाठी अनैतिक कायदेशीर अधिकार मिळवतात.

4) नफा लूट यातील फरक

प्रत्यक्षात या नवीन आर्थिक नीतीचा (कुनीती म्हटलं तर जास्त उपयुक्त ठरेल) आधार आहे बोली लावा, म्हणजेच कृत्रिम गरजा निर्माण करा. खोट्याला खरे म्हणून विका आणि हे खोटं विकणारी एक गर्दी तयार करा ज्याला हे बाजार म्हणतात. म्हणजे मुळात एक रुपयाच्या वस्तूला गर्दी म्हणजे बाजारात बोली लावून (सेन्सेक्सच्या जुगार खाण्यात) एक कृत्रिम गरज निर्माण करून त्या वस्तूला एक लाख रुपयाचे बनवणेआता एक रुपयाची वस्तू एक लाखाची झाली यालाच हेअर्थ सृजनम्हणतात आणि या खोट्या संकल्पनेला बनवणार्‍या आणि पसरवणार्‍याला अर्थतज्ज्ञ. अशाच खोट्यांना नोबेलने पुरस्कारीत केले जाते. मग या खोट्याचा फुगा जेव्हा फुटतो त्याला हे आर्थिक मंदीचा काळ म्हणतातजीडीपीची तिरडी घेऊन फिरणारे, जगातील भूकमारी, हिंसा, युद्धाचे समर्थक आणि जबाबदार हे सामान्य जनतेला अर्थव्यवस्थेची समज नाही असे म्हणतात.. पण या लुटारूंना आहे. मग हे लुटारू पुन्हा पारदर्शकता, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि मानवतेच्या भावना व्यक्त करतातजगातील मध्यमवर्गीय यांचे गोडवे गातात आणि अशा देशांना विकासाचे रोल मॉडेल समजले जातेजगातील सर्वात मोठी लोकशाही यांच्या दयाभावावर मोक्ष मिळविण्याचा मार्ग शोधते.

5) कट्टरवाद

दक्षिण पंथी राजकीय पक्ष केवळ आणि केवळ भावनांचे राजकारण करतात. हे पक्ष जनतेच्या भावनांचे राजनीतिकरण करतात. यांचे शस्त्र आहे भावना. हे जन आस्था, विश्वास, धर्म, राष्ट्रीयत्व, संस्कृती, संस्कार, सांस्कृतिक वारसा वाचवण्याचा दावा करतात आणि याच मुद्यांवर भर देतात या मुद्यांवर यांना जनसमर्थनही मिळते. पण प्रत्यक्षात या राजनीतिक पार्ट्या भावनिक मुद्यांचे राजकारण शुद्ध स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करतात किंवा असं म्हणू शकतो की हेच त्यांचे खरे राजनीतिक मुद्दे आहेत. असे मुद्दे जनतेच्या जवळचे असतात किंवा सर्वसाधारणपणे प्रत्येक नागरिकाच्या गर्वासमान हे मुद्दे असतात, सन्मानाचे प्रतीक असतात आणि सामान्य नागरिक याबद्दल जास्त विचार करत नाही.

6) संविधानिक व्यवस्थेच्या वैधतेवर हल्ला

दक्षिण पंथी कट्टरवाद्यांनी युवांना भडकविण्यासाठी उपयुक्त षड्यंत्र रचले आहे. युवांच्या मनाला मैले केले आहे, त्यांच्या भावनांना उत्तेजित करून त्यांच्या तर्क विचार करण्याच्या बौद्धिक क्षमतेचा र्‍हास केला आहे…. चौकटी बद्ध केले आहे आणि इतपत विष भरले आहे की भारतीय संविधानाच्या पवित्र तत्त्वांच्या विरोधात या युवकांच्या हृदयात विष घोळले आहे, याचे उदाहरण आहे अलीकडेच भारतीय विषमतांमध्ये सामाजिक न्याय आणि समतेसाठी अनिवार्य पुढाकार आरक्षण या मुद्यावर उठलेला गदारोळ, हे याचे प्रमाण आहे की, उच्चवर्णीय युवा आरक्षणाला आपल्या प्रगतीतील अडथळा मानतात.
प्रश्न आरक्षणाचा नाही, मुळात प्रश्न असा आहे की कृषीला आरक्षणाची गरज का भासली? शेतीची अशी अवस्था का झाली ज्यामुळे शेतकर्‍याला आत्महत्या करावी लागत आहे, युवांचे कृषीला एक रोजगाराच्या स्वरूपात स्वीकारणे हा पर्याय कमीच दिसून येतो, एका ग्रामीण व्यवस्थेतल्या कृषीप्रधान देशात शेतकर्‍यांची अशी अवस्था का आहे? छाती ठोक, आत्मघोषित राष्ट्रवादी पार्टी आणि त्यांची सरकार अमेरिकेच्या दबावामुळे डब्ल्यू. टी. . च्या कृषी विरोधी करारावर सही करते आणि त्यांचे मंत्री संसदेत हे म्हणतात. मजबुरी थी जी करना पडा हाच या राष्ट्रवादी सरकारचा खरा चेहरा .. कथनी आणि करनीमध्ये काहीच साम्य नाहीएवढंच नाही तर या देशाच्या सार्वभौमत्वाचा अनर्थ केल्याचे हे प्रमाण आहे. हे दक्षिण पंथी राजनैतिक पक्ष नवीन आर्थिक उदारवादाच्या काळात नवीन रोजगाराच्या संधी कशा वाढतील, युवकांना रोजगार कसे उपलब्ध होतील, सरकार नवीन रोजगार कसे निर्माण करतील यावर चर्चा नाही करत. कारण यांना युवांना रोजगार मिळवून देण्यापेक्षा जातीचा आधार घेऊन जातीवादी युद्ध घडवून आणण्यात जास्त रुची आहे, जेणेकरून हे स्वतःचा हिंदुत्ववादी अजेंडा लागू करू शकतील. या कृषीविरोधी सरकारला लक्षपूर्वक पहा, खरं तर शेतकर्‍यांची अवस्था सुदृढ करण्याचे काम करायचे होते, परंतु ते करता, जे शेतीवर अवलंबित आहेत त्यांना आरक्षणाच्या होळीत ढकलून दिले.

7) एकाधिकार वाद

हा लेख यासाठी लिहिण्याची आवश्यकता भासली. कारण आतापर्यंत हा खेळ लपूनछपून खेळला जात होता, परंतु आता तर सगळे उघडपणे केले जात आहे. भांडवलशाहीने जगातल्या सगळ्या समाजवादी सरकारांना उद्ध्वस्त केले आणि भूमंडलीकरणाचे चक्र चालवले जिथे खरेदी आणि विक्रीच्या राजनैतिक मूल्यांना स्थापित केले गेले. त्याचबरोबर संस्कृती, श्रद्धा-अंधश्रद्धा, आस्था, धर्म, देव आणि विज्ञानाचे असे मिश्रण केले की, मनुष्य सामंतवादी व्यवस्थेच्याही खाली जाऊन घसरला.
उदाहरणार्थ – स्वतःला आधुनिक बोलणारे मानव आज किती हिंसक आहेत. त्याने आण्विक अविष्काराला स्वतःचे कब्रस्तान बनवले. खरेदी-विक्री किती हिंसक आहे-म्हणजे जे विकले जाऊ शकते तेच जिवंत राहणार-आज विकासाच्या नावावर-बंधुआ मजदुरी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या जगातल्या संपत्तीवर कब्जा करणार्‍या चोरांचा गड आहे. आपल्या गुन्हेगारांना सगळ्या सुखवस्तू मिळण्याकरिता कर्ज देते आणि आयुष्यभर त्यांना गुलाम बनवून ठेवते- त्यांना इच्छा असली तरी ते सोडून नाही जाऊ शकत. कारण कर्ज कसे फेडणार? आणि वरून या चोरांचा शगुफा वी आर लिबरल यू हव चॉईस; पण मगरींच्या घोळक्यात अडकल्यावर कसले आले चॉईस? बस आयुष्यभर बाजारात विकले जा.

8) भांडवलशाही मीडियाचे वर्चस्व

लोकतंत्राचा चौथा स्तंभ मीडिया भांडवलशाही आणि अंधश्रद्धेला विकण्याचे मार्केट आहे. देशाचे राजनैतिक नेतृत्व भांडवलशाहीचे पंख लावून विदेश भ्रमण करण्यात अव्वल आहेत. देशातले वृद्ध टीव्हीवर मोठ्या धार्मिक गुरूंच्या जाळ्यात अडकून देवाच्या नावाखाली अंधश्रद्धेचे गुलाम बनून आपल्याच मुलांशी भांडत आहेत. युवाविज्ञानच्या नावाखाली तंत्रज्ञानाला विकत आहे. मध्यमवर्गीय उपभोगतावादाच्या चक्रव्यूहात भांडवलशाहीला आपला सेवाहार मानून बुलेट ट्रेनचे स्वप्न बघत होते. जिथे सरळ स्वर्गातील पायर्‍यांवर पाऊल ठेवले जाऊ शकेल. म्हणजे ज्यावेळी सामंतवादी व्यवस्थेमध्ये मुट्ठीभर लोकांच्या हातात विश्वाची संपत्ती होती- 400 वर्षांनंतर – ‘लोकतांत्रिकजगात शेअर मार्केटच्या माध्यमातून ती संपत्ती परत मुठ्ठीभर लोकांच्या हातात आहे.

9. विकासाचे मॉडेल
एक भांडवलशाही अजगर जो स्वतःलाच गिळतो आहे आणि महानगराचा आकार घेऊन विकासाचे मॉडेल बनून खरेदी विक्रीची माळ जपत आहे. विनाशाच्या दिशेने पुढे जात आहे. या महान अमानवीय विनाशापासून वाचण्यासाठीखरेदी आणि विक्री या सूत्राला मुळापासून नाकारणे. जेवढी गरज तेवढा उत्पाद. अनियंत्रित मुनाफा संपवणे आणि मेहनतीचा मोबदला देणे. प्राकृतिक संसाधनांवर जनतेचा हक्क, पाणी, हवा, भूमी आणि प्रकृतीचे संवर्धन, पुनःसंवर्धन या बाबी आवश्यक आहेत.
विकासाचे मॉडेल असणार्‍या महानगरांचा तिरस्कार आणि आत्म स्वावलंबी गावांना प्रकृती प्रिय विकास, भांडवलशाही ऐवजी खर्‍या अर्थाने लोकतंत्र, तंत्रज्ञान ऐवजी विज्ञान जीवनाचे आधार बनेल. हाच सर्वोत्तम मार्ग आहे, जो विनाशाच्या समोर उभ्या मानवता आणि आण्विक आविष्कारांच्या अभिशापापासून मानव आणि सृष्टीला वाचवू शकेल.

10) पथनाट्याविषयी गैरसमज 

पथनाट्य हा काही माकडांचा त्याच्या मालकांचा खेळ नाही, असे सो कॉल्ड रंगकर्मीं सांगतात. गोष्ट मदारीच्या श्रमाची आणि वाक्पटुता आणि त्याच्या पराभवाची नाही आहे. गोष्ट उद्देशाची आहे, की जिथे पथनाट्य प्रत्येकसमस्येलाउघडपणे प्रेक्षकांसमोर ठेवते तिथे मदारी फक्त आपल्या वाक्पटुतेमधून आपलेपोट भरतो’ , जिथे पथनाट्य जनतेला त्यांच्या मुद्यांवर भांडायला शिकवते, संगठित करून संघर्षासाठी उत्प्रेरित करते.
पथनाट्यलोकनाट्यपण नाही. कारणलोकनाट्यआणि पथनाट्याच्या निर्माणात वैचारिक अंतर आहे. पथनाट्य शुद्धपरिवर्तनाच्याजाज्वल्यतेने ओतप्रोत आहे आणिलोकनाट्यमुळात लोकांच्या आनंदासाठीची एक अनुभूती आहे.
पथनाट्य कोणत्याही फिल्मी गाण्याची पैरेडी नाही. हे हास्याचे माध्यम पण नाही. हे शोषितांचे शेवटचे शस्त्र आहे. कारण न्यायाचे सगळे दरवाजे जेव्हा बंद होऊन जातात तेव्हाशोषितांकडेरस्त्यावर उतरल्या शिवाय कुठलाच मार्ग उरत नाही. पथनाट्याचे विषयजन सरोकारांनीओतप्रोत असतात. या विषयांमध्येराजनैतिकव्यवस्थेला बदलण्याचा सूर प्रखर असतो.
म्हणून पथनाट्यकर्मींमध्ये राजनैतिक प्रक्रियेची जागरूकता अनिवार्य आहे. जेव्हा उपाशी पोटाला जेवण मिळत नाही, बलात्काराचा शिकार झालेल्या व्यक्तीला न्याय नाही मिळत, मजदूर आणि कृषीला जेव्हा आत्महत्या करावी लागते, जातीमुळे वर्षानुवर्षे तिरस्कार सहन करावा लागत असेल, हुंड्यासाठी कोणाला जाळलं जात असेल किंवा तंत्रज्ञानाचा उपयोग करूनलिंगनिदानकरून गर्भातून पाडले जात असेल तिथेजोकनाही मारला जाऊ शकत, फक्तवेदनेचे विश्लेषण करून स्वतःच्या हक्कांसाठी लढा दिला जातो. ‘हे दुर्दैव आहे की आता पथनाट्याचा उपयोगमार्केटिंगसाठी केला जात आहे. हे सर्वसामान्य जनता आणि परिवर्तनाच्या सर्व सुलभ शस्त्रावरखरेदी आणि विक्रीच्या संस्कृतीला जोपासणार्‍यांचे या माध्यमावर हक्क गाजवण्याचे षड्यंत्र आहे.
या विक्राळ आव्हानांचा सामना आजजनताकरू इच्छित आहे तर त्यांच्यासमोर 400 वर्षांआधी सुत्रपात झालेली कला म्हणजेच पथनाट्याचा उपयोग एक सशक्त पर्याय आहे. कारण हा व्हर्च्युअल संवादाऐवजी सरळ संवाद आहे. विश्वास जागृत करणारे आणि क्रियान्वनच्या दिशेने प्रेरित करणारे माध्यम आहे. व्यक्तिवादाऐवजीसामूहिकतेलावाढवणारे आहे. या युवा देशातल्या युवांच्या ऊर्जेला योग्य दिशा देणारेसामान्य जनतेचे सामान्य माध्यम आहे .जनतेला ठगणार्‍या पोलिटिकल रॅल्यांच्या बाजारू माध्यमांच्या थेट प्रक्षेपणाला तोंड देणारे विश्वसनीय माध्यम आहे. कारण पथनाट्य संसाधनांनी नाही तर न्यायसंगत भावना आणि सर्वसामान्यांच्या वैचारिक वचनबद्धतेच्या इंधनाने चालते.

मंजुल भारद्वाज (रंगचिंतक)